राजोली: शिक्षण प्रसारक मुलं द्वारा संचालित, नव़भारत विद्यालय राजोली येथे शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ ठेवण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधाकर एस. पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. शरद बोबडे, मार्गदर्शक म्हणून विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री ईश्वर टांगले, गजानन टिकले, गणेश खडसे, अतुल ठिकरे उपस्थित होते.विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व प्रतिमे समोर दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची व प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली. भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये, असा सल्ला प्राचार्य सुधाकर एस पुराम यांनी दिला.तर मार्गदर्शक श्री ईश्वर टांगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आलं तर खचू नका, कोलमडू नका, पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल तसेच स्वतःवर विश्वास ठेवा, आवडीच्या विषयात करिअर करा मात्र जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आई-वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमा दरम्यान इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला व उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.वृषाली भानारकर मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी कु निसबा शेख हिने केले तर उपस्थितांचे आभार इयत्ता ९ वी चा विद्यार्थी तन्मय खोब्रागडे याने मानले . कार्यक्रमाचे वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.