Homeचंद्रपूरबेंबाळ प्रादेशिक पुरवठा योजना आठ दिवसापासून बंद आठ गावे पिण्याच्या शुद्ध...

बेंबाळ प्रादेशिक पुरवठा योजना आठ दिवसापासून बंद आठ गावे पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित

बेंबाळ: प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील आठ दिवसापासून बंद अवस्थेत असून आठ गावातील जनतेला शुद्ध पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

पाणीपुरवठा योजनेमध्ये गोवर्धन नांदगाव घोसरी बेंबाळ नवेगाव भुजला, बाबराडा,चेक दुगाळा कोरंबी या गावाचा समावेश आहे, सदर पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराशी संपर्क केला असता वीज बिल थकीत व पाणीपट्टी थकीत असल्याने पाणीपुरवठ्याची वीज कापली गेली आहे त्यामुळे बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा बंद आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन व वीज बिल भरणा करून बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी नागरिकांची मागणी आहे,

विज बिल थकीत असल्यामुळे सदर पाणीपुरवठा बंद झालेला आहे परंतु येत्या दोन दिवसात सदर वीज बिल भरणा करून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येईल.
कनिष्ठ अभियंता
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मुल

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!