प्रितम म.गग्गुरी(उपसंपादक)
आल्लापल्ली:- सध्याच्या काळात स्पर्धा परीक्षांना अन्यनसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. उत्तम करिअर,चांगली नोकरी, पदवीधर चांगला अभ्यासक्रम, मानसन्मान, प्रतिष्ठा, पारितोषिके इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्राप्त होते. बऱ्याचदा पदवी पूर्ण होईपर्यंत सरकारी नोकरी कशी मिळते? त्यासाठी पात्रता कोणती असते? अर्ज कुठे मिळतात? सरकारी नोकरीसाठी वेगळा कोर्स करावा लागतो काय? परीक्षा असेल तर त्यासाठी कोणता अभ्यासक्रम असतो?असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना या उमेदीच्या काळामध्ये सतावत असतात.
पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा या उद्देशाने स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय, आलापली येथे स्पर्धा परीक्षा क्लासेसचे थाटात उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे कार्य. प्राचार्य कोहपरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून स्पर्धा परीक्षेचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी आपले करियर उत्कृष्ट करून जीवनमान उंचवावे अशा प्रकारचे आवाहन केले . या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. बोरकर सर उपस्थित होते.
प्रा. गर्गम सर प्रा.पारखी मॅडम हे सुद्धा उपस्थित राहून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बारसागडे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए.ची विद्यार्थीनी निशा पुजारी तर आभार प्रदर्शन बी.एससी. ची विद्यार्थिनी धनश्री इंदुरकर यांनी केले.