संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. दरम्यान कोंडया महाराज संस्थान धाबा येथे झालेल्या जनसंवाद पदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
गोंडपिपरी तालुक्यात मागील सहा दिवसापासून जनसंवाद पदयात्रा सुरू आहे. तालुक्यातून काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला प्रत्येक गावात जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. खराळपेठ गावापासून सुरुवात झालेली काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा धाबा नगरीत पोहोचली.
पदयात्रेत गावातील हजारो नागरिकांनी सहभागी होऊन महागाई, बेबंधशाही,भ्रष्टाचारी, अत्याचारी, राजेशाही, हुकूमशाही व लोकशाही विरोधी भाजपा सरकारचे विरोधात नारेबाजी करत काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला समर्थन दिले.
प्रसंगी राजूराचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे सह तालुक्यातील संपूर्ण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह धाबा गावातील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.