अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जननायक खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील खराळपेठ गावापासून जनसंवाद पदयात्रेला सुरुवात झाली.दरम्यान गोंडपिपरी तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ राजुराचे माजी नगराध्यक्ष, तथा विधानसभा समन्वयक अरुणभाऊ धोटे यांचे नेतृत्वात करण्यात आला. खराळपेठ या गावापासून आज सकाळी ६:००वाजता पदयात्रा निघाली.यात्रेत सहभागी राजुरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा नियोजित मार्गावरील गावोगावी व गावातील नागरिकांची संवाद साधला. तालुक्यातील खराळपेठ, चेकबोरगाव,बोरगाव धानापूर, करंजी, आक्सापुर असा २५ किलोमीटर प्रवास करीत ठिकठिकाणी देशाचे केंद्र सरकार, राज्यातील शिंदे सरकार यांचे धोरणे महागाई,भ्रष्टाचारी, बेरोजगारी, अन्याय,अत्याचार याबद्दल जनजागृती करणारे परिपत्रके वाटून, याबद्दल जनजागृती करणाऱ्या नारे, कारण सभा घेवून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
पदयात्रादरम्यान काही कालावधीने बोरगाव पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परंतु जनसंवाद साधने महत्त्वाचे असल्याने गोंडपिपरीतील जनसंवाद पदयात्रेत सहभागी अरुणभाऊ धोटे यांनी सहभागी कार्यकर्त्यासह नैसर्गिक परिस्थितीला मात करून जनसंवाद पदयात्रेत सहभागी झालेल्या संपूर्ण कार्यकर्त्यांसह अख्या पावसात भिजत पदयात्रा काढली व गावागावातील नागरिकांशी संवाद साधला.
प्रसंगी राजूराचे माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांचेसह गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व सेलचे पदाधिकारी, नेते,कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, व नगरपंचायतीचे पदाधिकारी, बाजार समितीचे संचालक, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य, यासह तालुक्यातील महिला व नागरिक शेकडोच्या संख्येने सहभागी झाले.