राजुरा : श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील इतिहास, राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या सयुंक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १२३व्या पुण्यतिथीचे व अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत असतांनाच त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याची तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती व्हावी, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये, येणाऱ्या भावी पिढीमध्ये टिळकांचे विचार त्यांचे कार्य व महापुरुषांचे स्मरण होईल यासाठी “टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान” या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी महाविद्यालयात लोकमान्य टिळकांच्या व अण्णाभाऊ साठे या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पूजन करण्यात आले,
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राजुरा विधानसभेचे माजी आमदार तथा आ.शि. प्र. म. राजुरा चे कार्याध्यक्ष मा. संजयभाऊ धोटे तर प्रमुख अतिथी म्हणून आ. शि. प्र. म. राजुरा चे सचिव मा. अविनाश जाधव उपस्थित होते.
श्री धोटे यांनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात टिळकांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते याची माहिती दिली सोबतच अण्णाभाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थिती मधे कामगारांसाठी लढा देत साहित्य विश्वातील योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या चरित्रातून धडा घेत आपले व्यक्तिमत्त्व घडवावे असे या प्रसंगी जाधव यांनी सांगितले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. कशीश रोहणे, द्वितीय क्रमांक अतुल देहारकर तर तृतीय क्रमांक सायली रोगे हिने पटकविला.
यावेळी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.वारकड, उपप्राचार्य डॉ आर. आर. खेरानी, स्पर्धेला परीक्षक म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ संजय लाटेलवार, डॉ राजेंद्र मुद्दमवार, प्रा. गुरुदास बल्की व विद्यार्थी उपस्थित होते