राजुरा: तालुक्यातील चिंचबोडी येथे (ता.२७) रोजी सरपंच आनंदराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली जी. प. शाळेत शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. सदर सभेस कृषी सहायक दिपक काळे यांनी उपस्थित शेकऱ्यांना सोयाबीन उत्पादक्ता वाढीकरिता शेतकऱ्यांनी अष्टसूत्री पद्धतीचा वापर करावा. याकरीता कृषी विभागाच्या वतीने शेतकरी बांधवाना आव्हान करण्यात आले. तसेच पट्टा पद्धत /बीबीएफ, आंतरपीक, सापळा पिकाचे महत्व,बिजप्रक्रिया, उगवणक्षमता, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क,जीवामृत,कापूस पिका करीता रुंद वरंबा सरी पद्धतीचे महत्व,पी. एम. किसान योजनेसाठी के.वाय.सी व बँक आधार सीडींग कृषि यांत्रिकिरण, नामशेश होत असणाऱ्या राळा, बाजरी, ज्वारी, नाचणी राजगिरा या तृणधान्याचे आहारातील महत्व गोपीनाथ मुढे शेतकरी अपघात योजना, पिक विमा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, शेततळे योजना,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शंभर टक्के अनुदानवर फलबाग लागवड योजना, गांडूळ युनिट, व्हर्मी कपोस्ट, सेंद्रिय शेतीचे महत्व, कामगंध सापळे, प्रकाश सापळेमुळे होणारी किड नियंत्रण तसेच कृषी विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, अंबुजा फाऊंडेशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.