बळीराम काळे, जिवती
जिवती (ता. प्र.) : महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमावदात अडकलेल्या वादग्रस्त १४ गावाच्या सीमांकनाबाबत २५ lवर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा तोडगा काढण्याकरिता आमदार, सुभाष धोटे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून वादग्रस्त १४ गावाच्या सीमांकनाचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे १५ सप्टेंबर २०२२ पासून वादग्रस्त १४ गावातील २३८७ हेक्टर जमिनीपैकी मुकदमगूडा या गावाच्या महसूल मोजणीला सुरुवात करण्यात आली व १९ मे २०२३ ला मुकदमगूडा या वादग्रस्त गावाची ४२९ हे.आर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले.
महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद अडकलेल्या वादग्रस्त १४ गावांच्या मोजणीचा प्रश्न प्रलंबित असलेल्या पैकी मुकादमगुडा या गावाला मा.जिल्हाधिकारी महोदय यांनी प्रत्यक्ष भेट दिली व सदर गावाची मोजणी कामांची पाहणी करून उर्वरित गावाच्या मोजणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यासाठी आवश्यक असलेला निधी तात्काळ उपलब्ध करून देत असलेचे सांगून त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास आदेशित केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी, विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी, संपत खलाटे, तहसीलदार, दीपक वजाळे, गटविकास अधिकारी, डॉ.भागवत रेजीवाड, उपअधीक्षक भूमी अभिलेख, संजय बडकेलवार, रामदास रणवीर, लिंबादास पतंगे व परिसरातील नागरिक मोठ्या उपस्थित होते.