Homeचंद्रपूरपरिवर्तनातून मतदारांनी युवा नेतृत्वाला दिलेली सेवेची संधी सार्थक ठरेल - माजी मंत्री...

परिवर्तनातून मतदारांनी युवा नेतृत्वाला दिलेली सेवेची संधी सार्थक ठरेल – माजी मंत्री वडेट्टीवार

सिंदेवाही- देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक ,गृहिणी व सर्व सामान्यांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भाजपा सरकारला आता उतरती कळा लागली असून कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या निकालातून ते पुढे आले.तर गेल्या दहा वर्षापासून सिंदेवाही कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस प्रणित शेतकरी परिवर्तन सहकार आघाडी पॅनलला निवडून देत भाजपा प्रणित पॅनलचा पराभव केला. काँग्रेस प्रणित विजयी पॅनल मध्ये युवा नेतृत्वाचा भरणा व व ज्येष्ठांच्या अनुभवाची सांगड असल्याने परिवर्तनातून मतदारांनी युवा नेतृत्वाला दिलेली सेवेची संधी सार्थक ठरेल असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते सिंदेवाही येथे कृषी उत्पन्न बाजार समिती च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार व नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कृउबा समिती माजी सभापती रामचंद्र पाटील गहाणे, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम, बाबुरावजी रामटेके, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अशोक साळवे, सुमितभाई उनाडकट, ब्रह्मपुरी नगरसेवक डॉ. नितीन उराडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, उपसभापती दादाजी चौके ,शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार,काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष सीमा सहारे सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, वीरेंद्र जयस्वाल ,राहुल पोरेड्डीवार, सचिन नाडमवार, तथा सर्वश्री नवनिर्वाचित संचालक भास्कर घोडमारे नरेंद्र गहाणे मंगेश गभने, नरेंद्र भैसारे, जानकीराम वाघमारे, राहुल बोडणे जयश्री नागपुरे (कावळे) जगदीश कामडी संजय पुपरेड्डीवार प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना माजी मंत्री आ.वडेट्टीवार म्हणाले की, सन 2008 मध्ये राज्यमंत्री असताना भोसे खुर्द प्रकल्प अंतर्गत शेती व्यवसाय करिता उन्नतीची वाढ झाली तर सन 1984 देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधीजींनी ज्या गोसेखुर्द प्रकल्पाची निव मांडली व सोनिया गांधींनी शेतकऱ्यां प्रतिउदारता दाखवून त्यावेळचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना प्रकल्प मंजुरी देण्यासाठी व 4990 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. गोसेखुर्द प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचे संपूर्ण श्रेय यूपीए सरकारचे असून आज शेतकऱ्यांच्या उत्पादनात या प्रकल्पामुळे मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र आजच्या भाजप सरकार काळात शेतकरी देशोधडीला लागला असून शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. मतदार संघातील शेतकऱ्यांच्या आता पुढील वर्षी स्थान व मक्का उत्पादनाला हमीभाव आणि खरेदी करून शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीसाठी मोठा इथेनॉल प्रोजेक्ट उभारणी सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यानंतर सर्व नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाहीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊ सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देत शेतकऱ्यांचे प्रगती साधने हेतू प्रयत्नशील राहणार अशी काही नवनिर्वाचित सभापती रमाकांत लोधे यांनी दिली. यावेळी तालुक्यातील सहकार क्षेत्र ,ग्रामपंचायत गट, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!