बळीराम काळे,जिवती
जिवती (ता.प्र.) : ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन ०२ वर्षे पूर्ण झाले असून आतापर्यंत जिवती तालुक्यातील पीडित, शोषित, गरजू रुग्णांना या नविन रुग्णालयाचा फायदा होत नाही, मग ही ईमारत बांधून काय कामाची ?
सरकार एवढा मोठा निधी खर्च करून सामान्य माणसाच्या हितासाठी ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली आहे परंतु शासन आणि प्रशासनला या इमारतीचा विसर पडला की काय? हा प्रश्न सर्व सामान्य जनतेना भेडसावत आहे.
जिवती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णाची गैरसोय मोठ्या प्रमाणावर होत आहे, किरकोळ सुविधेसाठी गडचांदूर किंवा चंद्रपूर च्या रुग्णालयामध्ये रेफर केले जाते. म्हणून तालुक्याच्या ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या प्रकारच्या रुग्णांना सुविधा मिळणे आवश्यक आहे, पण असे होतांना दिसत नाही. हेच ग्रामीण रुग्णालय चालू झाले तर सोनोग्राफी, शस्त्रक्रिया करणे, शव विच्छेदन करणे, यासह आवश्यक सुविधा रुग्णांना उपलब्ध होतील.
एका महिन्याच्या आत सुरू करून सर्व सामान्य रुग्णांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी जयवंत गोतावळे, केशव चव्हाण, सीताराम सोयाम, सूर्यभान कुलसंगे व विराआस सोशल मीडिया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल राठोड उपस्थित होते.