सतत कार्यरत शिक्षक शाळेत येत नाही,म्हणून चक विद्यार्थी उतरले रस्त्यांवर शिक्षक पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी भर उन्हात रस्ता…

453

जिवती (तालुका प्रतिनिधी) : तालुका अंतर्गत तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत दांडी बहादुर शिक्षक येतच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्हाला शिक्षक द्या हो शिक्षक म्हणत शाळेतील पूर्ण विद्यार्थ्यांनीच एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केल्याची घटना समोर आली आहे. आणि ती तेजीने समाज माध्यमातून व्हायरल होत आहे.

शाळेत शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षकासाठी शेवटी पंचायत समितीच्या दिशेने गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतर पायी प्रवास करीत निघाले. चक्क शिक्षण अधिकारी यांचे दालनात जाऊन बैठक करणार आहोत असे विद्यार्थ्यांनी सांगितले. हे प्रकरण पाहत गावचे पोलिस पाटील यांनी टेकामांडवा येथील पोलिस प्रशासनाला माहिती दिली असता सउपनि, रवींद्र म्हैसकर, टेकामांडवा हे आपल्या ताफ्यासह शाळेत पोचले त्यांनी विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी केंद्र प्रमुख बावणे यांनी सांगितले की तालुक्यात अठ्ठावण शिक्षकांची रिक्त पदे आहेत त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली असून यावर चार दिवसात शिक्षक देऊन समस्या सोडवून देण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे मुलांना दुपारचे जेवण ही नव्हते भर उन्हात चटके सहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. विद्यार्थी सांगत होते की आम्ही यावर्षी क्रीडा स्पर्धांची तयारीही केली परंतु आम्हाला क्रीडा संमेलनात सहभागी करून घेतले नाही. यावेळी पोलिस पाटील, पोलिस प्रशासन, केंद्रप्रमुख यांनी मुलांची समजूत काढली
पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता सातवी पर्यंत असून ७२ एवढी पटसंख्या आहे. सदर शाळेवरील शिक्षक कधी सुट्टीवर तर कधी अवेळी येतात. रजा मंजूर नसतांना देखील सुट्टीवर जातात यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत वरिष्ठांना सहा महिन्यापासून कळविण्यात येत असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे, अध्यक्ष, व्यंकटी जाधव यांनी सांगितले. बानकर व कोयलवार हे शिक्षक मनमानी सुटीवर राहतात. अशी माहिती गावकऱ्यांनी दिली व दांडी बहाद्दर शिक्षकांवर कार्यवाही करण्याचीही मागणीही केली.

कोट – जि. प.शाळा पाटागुडा येथील दोन शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त मिळाल्या असून चौकशी सुरू आहे.
चौकशीअंती दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे, यासाठी आजपासून पाटागुडा येथील शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक केली आहे.