Homeचंद्रपूरजंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या कापसांच्या बोंडाचे अतोनात नासधुस...शेतकरी अडकले आहेत विवंचनेत...

जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या कापसांच्या बोंडाचे अतोनात नासधुस…शेतकरी अडकले आहेत विवंचनेत…

बळीराम काळे,जिवती

जिवती (तालुका प्रतीनिधी.) : तालुक्यातील आधीच सर्व
शेतकरी अतिवृषटी व अस्मानी संकटाचा सामना करीत असताना वन्य प्राणी शेतातील कापसांच्या पिकांची नासाडी करीत आहेत. माराई पाटण, वाडीगुडा व
राहापल्ली(बू)परिसरातील गावातील जंगलालगत असलेल्या शेतात मध्यरात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील कापसाची पीक व कापसाचे बोंड कसे वाचवावे या चिंतेत पडले आहे.
माराई पाटण, वाडीगुडा, व राहापल्ली (बू), परिसरातील जंगलालगत असलेल्या शेतातील कापसाच्या बोंडावर रानडुक्कराचा हैदोस सुरू आहे. रानडुक्कराचा कळप जंगलालगत लागून असलेल्या शेतातील पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी पिकांचे रक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
माराईपाटण व वाडीगुडा,राहापल्ली (बू) या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती असल्याने ते सतत वनविभागाची मदत करीत असतात तसेच अवैध उत्खननावरही आळा घालण्यात मदत करतात. शेतकऱ्यांना वनविभागामार्फत तार कंपाउंड, सौर लाईट, झटका मशीन उपलब्ध करून देऊन मदत करावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माराईपाटण परिसरातील नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, जिवती यांना शेतकऱ्यांनी त्वरीत मागणी केली.
यावेळी शेषराव संभाजी कांबळे, यादवराव जंगु कोटनाके,राहुल एम.सोनकांबळे(पो.पा.), प्रल्हाद महादु काळे,भीमराव नागोराव कांबळे, धर्मपाल अर्जुन गायकवाड,गौतम सोपान लव्हराळे,शरद विसांबर कांबळे,विकास सोनकांबळे,शशिकला सितु कोटनाके, सोमा पेंदोर व माराई पाटण, वडिगुडा व राहापल्ली(बू)
गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!