चंद्रपुर: १९८१ मध्ये चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन ची निर्मिती झाली. त्यासाठी पुरवठ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इराई नदीवर असलेल्या धरणामुळे, धरणानंतर ही नदी संकुचित झाली. तिचे पात्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. तसेच पात्रात वेगवेगळ्या वनस्पतीच्या निर्मिती मुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
नदी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य तयार होऊन नदी दिवसेंदिवस उथळ होत आहे. दरवर्षी वर्षांतून तीन-चार वेळा नदीच्या पात्रातील पाणी पुराच्या माध्यमातून शहरात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकांना होणारा त्रास वाचविण्यासाठी, इराई नदीच्या तीरावरील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचे घरात नदिच्या पुराचे पाणी न यावे म्हणून, रोजगार निर्मिती व्हावी म्हणून, पर्यटन स्थळाची निर्मिती व्हावी म्हणून व या सर्व बाबीतून शासनाला टॅक्स व रेव्हेन्यू मिळविता येईल, चंद्रपुर शहरातील नागरिकांचा फायदा, शासनाच्या तिजोरीत उत्पन्नाचे मार्ग वाढतील म्हणून वृक्षाई पर्यावरण फाउंडेशनचे श्री खुशाब कायरकर आणि आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या संयुक्त विद्यमाने इराई बचाव या आंदोलनाच्या अनुषंगाने इराई नदीच्या खोलीकरणासाठी महात्मा गांधी जयंती दिनी इराई पदयात्रा; जल सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
“पदयात्रेची सुरुवात पठाणपुरा स्मशान भुमी येथून होऊन पुढे विठ्ठल मंदिर वॉर्ड- गोपालपुरी-बिनबा गेट-नगीनाबाग पासून दाताळा मार्गावरील इराई नदी पात्र येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली.