जिवती(ता.प्र.)तालुक्यातील ग्राम पंचायत पुदियाल मोहदा येथील रसत्यांचे आणि रसत्याचे बाजूने असलेल्या नालीचे बांधकाम मागील पाच ते सहा महिन्यापुर्वी काम झाले.मात्र ते काम निकृष्ट दर्जाचे झाले असून,रसत्याच्या दोन्ही बाजूला मुरूम भरलेला नाही.गावातील स्थानिक लोकांना आपले वाहन रसत्यावरून खाली उतरविण्यास व लहान मुलांना रसत्याचे कडेने जाताना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून पालकांना भिती वाटत आहेत.या प्रकारामुळे स्थानिकांना दुखापत उदभवल्यास त्याला जबाबदार कोण,असा प्रश्न गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अर्धवट बांधकाम असताना प्रशासन गप्प का,असाही प्रश्न आहे.सोबतच रस्त्याच्या बाजुनेअसलेल्या नालीचे बांधकाम अर्धवट आणि धोकादायक बांधकाम केलेले आहे.ज्यामध्ये नागरिकांच्या घरासमोरच त्या नालीत पाणी साचून राहते आहे.साचलेल्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नाहक त्रास होत असल्यामुळे ग्राम पंचायतीला अनेक वेळा तोंडी तक्रार केली असता,ग्राम पंचायतकडून ते आमचे काम नसून ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे,असे असे उत्तर मिळाले.आपल्या शेजारी असलेल्या राजुरा तालुक्यात दुषित पाण्यामुळे साथरोग उदभवून लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.असाच प्रकार गावात होणेही नाकारता येत नाही. कदाचीत तसे झाले तर त्याला जबाबदार कोण,असा प्रश्न गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या सर्व बांधकामाच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राम इंगळे यांनी थेट मुख्यमंत्री यांच्या कार्यालयास तक्रार पाठऊन केली आहे.सोबतच या प्रकरणाची लवकर चौकशी न झाल्यास त्यांनी स्थानिकाना घेऊन आंदोलन करण्याचाही इशारा केला आहे.