HomeBreaking Newsसफरचंद खाण्यासाठी गेलेल्या ६ वर्षाच्या मुलाचा विषारी साप चावल्याने मृत्यू...

सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या ६ वर्षाच्या मुलाचा विषारी साप चावल्याने मृत्यू…

-ब्युरोचिफ प्रशांत शाहा

बीड : बीडच्या धारुर तालुक्यातील वाघोली येथे कपाटात ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेलेल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याला विषारी साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य अप्पाराव गव्हाणे ( वय ६ वर्ष ) असे मयत चिमुकल्याचं नाव आहे. साप चावल्याचे समजल्यावर तातडीने त्यास अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास संपली.

घरातील कपाटात आणून ठेवलेले सफरचंद खाण्यासाठी गेला. त्याने कपाट उघडून सफरचंद घेतलं, यावेळी कपाटाच्या खाली लपलेल्या सापाने डाव्या पायाच्या पंजाला वरच्या बाजूने दंश केला. दंश करताच तो रडत बाहेर गेला व काहीतरी पायाला चावल व तो मऊ बेडका सारखं होतं असं म्हणाला. साप चावला असल्याची मनात पाल चुकचुकली अन् तातडीने त्यास अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले.
येथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

दोन दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास संपली. त्याच्या पार्थिवावर सकाळी 9 वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबाचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. तर अचानक अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्याचे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!