पातानिल येथील हत्ती आलापल्लीची अस्मिता; हत्तींना पडवून नेण्याचा षडयंत्र रद्द करा- साई तुलसीगारी (टायगर ग्रुप स्वयंसेवी संस्था संचालक)

722

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर कच्च्या रस्त्याने आत गेल्यावर पातानील गणेश मंदिर आहे.

आलापल्ली भागातील सागवान हे जगातील उत्तम दर्जाचे सागवान समजले जाते. १९८० च्या दशकात हे सागवान लाकूड व्यावसायिक पद्धतीने तोडणी व विक्री करण्यासाठी मुलभूत वाहक म्हणून हत्तींचा वापर केला जात होता. १९८१ साली या भागात वन विभागाच्या अखत्यारीत ४ हत्ती होते. कापलेले सागवान जंगलाबाहेर आणण्याच्या रोजच्या कामावर हत्ती नेमले असताना यातील एक हत्ती जंगलात बेपत्ता झाला. २ दिवस उलटूनही या किर्र जंगलात त्याचा काही पत्ता लागेना. शेवटी वन विभागाच्या शोध मोहिमेतील कर्मचारी व मजुरांनी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. ” हत्ती सापडू दे, ११ पोती नारळ फोडू ” आणि काय आश्चर्य काही क्षणातच हरविलेल्या हत्तीची किंकाळी मजुरांच्या कानी आली. मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडाला अडकले आहेत. ते काही केल्या निघेनात. शेवटी जोर लावून हा दगड बाहेर काढला गेला. बघतात तर काय चक्क या दगडाला श्री गणेशाचे रुपडे होते. या पद्धतीने वन विभागावरील संकट गणरायानेच दूर केले, म्हणून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी व मजुरांनी एकत्र येत ही मूर्ती साफ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.

हा सर्व प्रकार एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हता. आता पातानीलचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध पावला आणि ते हत्ती पण तिथेच राहू लागले आलापल्ली येते कोणताही सण असो आधी त्या 3 हत्तींनचे दर्शन व पूजा मगच सण साजरी पातानिल येतील हत्ती कधीच गावकऱ्यांनवर हिंसक झाले नाही . मात्र आता शासन त्या तीनही हत्तींना गुजरात येतील खाजगी प्राणी संग्रहालयात हलविणार आहे. हत्तींना इतर राज्यात हलविण्यापेक्षा एक मिनी इलेफांट्स पार्क पातानील येते बनवून या पातानील ला विकसित करण्यात आले पाहिजे ही टायगर ग्रुप आलापल्ली संचालक साई तुलसीगारी यांची मागणी आहे.