HomeBreaking Newsत्या तीन युवकांमुळे तो पोहचला तब्बल सात वर्षानंतर घरी...

त्या तीन युवकांमुळे तो पोहचला तब्बल सात वर्षानंतर घरी…

त्या तीन युवकांमुळे तो पोहचला तब्बल सात वर्षानंतर घरी…

आल्लापल्ली: सात वर्षा अगोदर वसीम एमदाद शेख या नावाचे व्यक्ती मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे घरदार सोडून घराबाहेर पडले. ते कुटुंबीयापासून दूर झाल्याने कुटुंबातील सदस्याने त्यांचा बराच शोध घेतल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. त्यामुळे तो पुन्हा घर येईल ही आशा सुद्धा कुटुंबीयांनी सोडली होती. वसीम घरापासून दूर झाल्यानंतर अहेरी तालुक्यातील नवेगाव वास्तव्यास होते. तिथेच सर्व ते करत होते.

आल्लापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते अंकित गोगुलवार,अंकित शेंडे, सोनू शेंडे यांना ही माहिती झाल्यावर त्या व्यक्तीशी सवांद साधले आणि त्या व्यक्तीशी बोलून त्या व्यक्तीविषयी आणि त्याच्या कुटुंबियाची माहिती काढली. त्या व्यक्तीची विचारपूस केल्यानंतर ती व्यक्ती चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे कळले. त्यानंतर त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधून त्या व्यक्तीची माहिती कुटूंबियांना देण्यात आली. तेव्हा वसीम एमदाद शेख याला घेऊन चंद्रपूर येथे त्याला पोहचवून अंकीत गोगुलवार,अंकित शेंडे, सोनू शेंडे यांनी आपले कार्य पूर्णपणे पार पाडले. अशाप्रकारे सात वर्षांपासून दूर गेलेल्या व्यक्तीला या त्रिमूर्ती मुळे हक्काचे घर मिळाले. समोर सुद्धा सामाजिक कार्यास तत्पर तयार राहणार असे त्यांनी इंडिया दस्तक न्यूज टीव्ही शी बोलतांना सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!