Homeनागपूरविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे काळाची गरज

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे काळाची गरज

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विज्ञान दिनाचे औचित्य साधून मौदा येथील संघर्ष करीयर अकादमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे युवा कार्यकर्ता निकेश पिने होते. यावेळी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा परिचय, वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा याविषयी माहिती देण्यात आली. तसेच जगात कोणतीही जादू किंवा चमत्कार घडत नसून यामागे विज्ञानाच आधार असतो. हे विविध प्रयोगाच्या माध्यमातून प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले. जसे की पान्याणे दिवे पेटवणे, पेटता कापूर खाणे , नारळातून विविध वस्तू काढणे, कमंडलमधे भूत पकडणे, स्वर्गात जल पाठवणे, लिंबातून रक्त काढून दाखवणे, जिभेत त्रिशूल आरपार काढणे असे विविध प्रयोग करून दाखवण्यात आले. तसेच जादूटोणा विरोधी कायदा, भूत भानामती, करणी, बुवाबाजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता ती सत्य मानणे म्हणजे अंधश्रद्धा होय असे प्रतिपादन या वेळी निकेश पिने यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट एकदम सत्य न मानता त्याची शहानिशा करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा असे प्रतिपादन केले.

यावेळी अंनिस युवा शाखेचे कार्यकर्ते ॲड.मृणाल तिघरे यांनी सूत्रसंचालन केले. संघर्ष करियर अकादमी चे प्राचार्य शैलेश किरपान यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विवेक जाने, प्रफुल बरगटकर, निखिल खुरसनकर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!