दिपक साबने,जिवती
यावर्षीपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली (इग्नू) ने फलज्योतिषचा पाठ्यक्रम पदविका,पदवी तथा पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. खगोल शास्त्रज्ञ फलज्योतिषाला मान्यता देत नाहीत. फलज्योतिषाचा अभ्यासक्रम भारतीय संविधानाच्या तत्वांना छेद देणारा व अवैज्ञानिक गोष्टीचे समर्थन करणारा असल्यामुळे तो ताबतोब बंद करावा अशा आशयाचे निवेदन अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा जिवती च्या वतीने देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार तहसील कार्यालय,जिवती यांच्या मार्फत देण्यात आले.
महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे.आपल्या भूमीचा बुद्धीच्या देशा असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामी पासून ते थेट संत गाडगे बाबा पर्यंत प्रबोधनाची परंपरा लाभलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले पासून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाज सुधारक होऊन गेले आहेत. या संतांची तथा थोर पुरुषांची परंपरा चालू ठेवणे हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य आहे .
ज्योतिषशास्त्राचा पाठ्यक्रम शिकून महाराष्ट्रामध्ये कर्मकांड करणारे, आपला वेळ, पैसा आणि श्रम वाया घालवणारे तरुण युवक तयार होतील. समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्याऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल. हे थांबविण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावरील देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जिवती च्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी राजकुमार चिकटे, अध्यक्ष, अ भा अं नि स, जिवती, दिपक साबने, सचिव, अ भा अं नि स, जिवती, बळीराम काळे,सह संघटक, संभाजी ढगे, संघटक , संदीप घुक्से, कोषाध्यक्ष, दयानंद कोमले, मोहन राठोड इत्यादी सदस्य उपस्थित होते.
इग्नू ने सुरू केलेला फलज्योतिषचा पाठ्यक्रम त्वरित बंद करावा-अभाअंनिस, जिवती…#ज्योतिष्यशास्त्राची मास्टरकी कोणासाठी ? कशासाठी?…अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जिवती च्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन…
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements