Homeसिरोंचापरिसरात भात लागवडी योग्य पाऊस...पन्नास टक्क्य़ांहून अधिक लागवडीची कामे पूर्ण...

परिसरात भात लागवडी योग्य पाऊस…पन्नास टक्क्य़ांहून अधिक लागवडीची कामे पूर्ण…

विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यत पन्नास टक्केहून अधिक भात लागवड पूर्ण झाली आहे. सध्या पाऊस मुसळधार पडत असला तरी हा पाऊस भातशेतीसाठी पूरक पाऊस असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.हा पाऊस किमान आठवडाभर सरसरीत पडला तर रोपे उगवायला पूरक वातावरण तयार होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यत जास्तीत जास्त क्षेत्रावर या खरीप हंगामात लागवड केली जाते. यामध्ये भात क्षेत्राचे प्रमाण मोठे आहे.तर कापूस,मिरची,अशी कडधान्य पिकेही मध्यम भागात घेतली जात आहेत.
जिल्ह्यत भात हे प्रमुख अन्न असल्यामुळे विविध ठिकाणी भात लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.किनारपट्टी भागासह पठारी व मध्यम भागात वेगवेगळ्या मातीच्या प्रकारानुसार हळवे, गरवे व निमगरवे अशा तीन पद्धतीची भातशेती केली जाते.गडचिरोली जिल्ह्यत सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र सिरोंचा, चामोर्शी, व एटापल्ली तालुक्यातील आहे.जूनच्या पहिल्या आठवडय़ात एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची भात पेरणीच्या रोपवाटिकेसाठी लगबग सुरू झाली होती.त्यानंतर पाऊस पडला नसल्यामुळे काही काळ शेतकऱ्यांमध्ये चिंता होती.मात्र त्यानंतर जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून पावसाला सुरू झाल्याने जिल्ह्यत बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या.त्यानंतर पुन्हा पावसाने उसंत घेतली.मात्र गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला व जिल्हाभर भात लागवडीला सुरुवात झाली.
आतापर्यंत जिल्ह्यतील तालुका बारा पैकी चार तालुक्यात जोरदार पाऊस पडल्याचे दिसून येते. तालुक्यांमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर भात,मिरची, कापूस लागवड झाली आहे.तर उर्वरित लागवड करण्याची लगबग जिल्हाभर सुरू आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!