Home Breaking News राष्ट्रीय महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण…

राष्ट्रीय महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण…

389

प्रितम गग्गुरी (प्रतिनिधी)

देसाईगंज शहरातून साकोली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बायपास मार्गे गेलेला आहे. मागील चार वर्षापासून या बायपास मार्गाचे काम रखडले आहे व पूर्णत्वास झालेले नाही.भुयारी रेल्वे पुलाखालून शहरात जायला यायला फक्त हलक्या वाहनांना परवानगी आहे.अवजड वाहने बायपास मार्गे प्रवास करतात.बायपास मार्गाचे काम चार वर्षापासून पूर्ण न झाल्याने अवजड वाहनांना या मार्गावरून मार्गक्रमण करायला अडचणी निर्माण होत आहेत,त्यामुळे हा बायपास मार्गाचा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. पावसा मुळे त्या मार्गावर चिखल व खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा झालेला आहे त्यामुळे वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे व एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.अवजड वाहन चालक नागरिकांनी अशी मागणी केली आहे की लवकरात लवकर या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास चे काम पूर्ण करावे.

Don`t copy text!