विजय तोकला
इंडिया दस्तक,सिरोंचा तालुका प्रतिनिधी
*सिरोंचा*:-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केली आहे.महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय व आदिवासी जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हा ओळखला जातो.या जिल्ह्यात अधिकाधिक शेती करणारे शेतकरी आहेत.त्यात धान उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात केली जाते.शेतकरी अहोरात्र कष्ट करून शेती व्यवसाय करत असतो.जिल्ह्यातील व प्रामुख्याने शेतकरी केवळ शेतीच्या भरवश्यावर उदरनिर्वाह करीत असतो.जिल्ह्यातील व तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी वारंवार मुदतवाढसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याने राज्य सरकारने 30 जून पर्यंत मुदतवाढ दिली परंतु ग्रामीण भागात ही माहिती पोहचली नसल्याने अजून काही शेतकऱ्यांचे विहित पोर्टलवर नोंदणीकृत केले शकले नाही.आणि तालुक्यात निर्बंध लागू असल्याने व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने 7/12 संगणकीकरण करता आला नाही.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एकच विनंती आहे की राज्य सरकारने 15 जुलै पर्यंत मुदतवाढ दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार.