Homeचंद्रपूरराजुराराजुरा जंगलात 30 लाखांचा गांजा जप्त; आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश...

राजुरा जंगलात 30 लाखांचा गांजा जप्त; आंतरराज्यीय गांजा माफियांचा पर्दाफाश…

चंद्रपूर : राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलातून दोन आंतरराज्यीय गांजा माफियांना आज (गुरुवार) अटक करण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून अंदाजे ३० लाख रुपये किमतीचा ९० किलो गांजा जप्त करण्यात आला. चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी (वय ३७), सागर वाल्मिक पाझारे (वय २६, दोघेही रा. वरोरा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

तेलंगणा राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधिक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात विशेष पथक पाळत ठेऊन होते.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात यापूर्वी याच परिसरात दोन कारवाया करण्यात आल्या. त्यात पहिल्या कारवाईत ७४ किलो, तर दुसऱ्या कारवाईत ८ किलो गांजा जप्तसुद्धा करण्यात आला आहे. तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे काही दिवसांपूर्वी मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सहाय्यक फौजदार केमेकर, पोलिस कर्मचारी गणेश भोयर, विनोद, प्रमोद, गोपीनाथ यांचे विशेष पथक तयार करून गांजा तस्करांवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले.

चार दिवसांपासून राजुरा पोलिस ठाणे हद्दीतील सुमठाना जंगलात हे पथक ठाण मांडून होते. आज सकाळच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीने गांजाची तस्करी केली जात होती. यावेळी या पथकाने वाहने थांबवून तपासणी केली. तेव्हा दुचाकी वाहनावरील दोन चुंगड्यात गांजा आढळून आला. तसेच चारचाकी वाहनातील ट्युबलेस टायरमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला. यावेळी अन्य दोघे सुमारे १० किलो गांजा घेऊन पसार झाले.

पोलिसांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली. त्यानंतर खाडे यांनी घटनास्थळ गाठले. पंचासमोर गांजाचे वजन केले असता सुमारे ९० किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. याची अंदाजे किंमत ३० लाख आहे. सर्व गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली वाहने जप्त केली. राजुरा पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी, सागर वाल्मिक पाझारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार दोघांचा शोध सुरु करण्यात आला आहे. हा गांजा राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा शहरात वितरित केला जाणार होता, अशी माहिती अटकेतील व्यक्तींनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!