चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू करण्यात आली. आज त्याला सहा वर्षे पूर्ण झाली होती. परंतु सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जिल्ह्यातील दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय व अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी गृहविभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आणि आज जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्याची घोषणा केली.