सुनील डी डोंगरे (कार्यकारी संपादक)
गोंडपिपरी ——
कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपला नाही ,कोरोनासंदर्भात लोकांनी खबरदारी घ्यावी यासाठी प्रशासनाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे .
सध्या कोरोना संदर्भात बरेच लोक बेफिकीर झालेले आहेत .तथापि कोरोनामुळे बाधित होणारे रुग्ण अद्यापही आढळत आहे .त्यामुळे कोरोना संदर्भात लोकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे . तहसीलदार के डी मेश्राम ,ठाणेदार संदीप धोबे यांनी गोंडपीपरी नगरात फेरफटका मारून कोरोना बद्दल जनजागृती केली .आणि मास्क वापरन्याचे आवाहन केली .ज्यांच्याकडे मास्क नाही अशांना मास्क चे वितरण केले .