HomeBreaking Newsगोंडपिपरी येथे युवा स्वाभिमान पक्ष समर्थित जय भवानी कामगार संघटनेचे उपोषण; सफाई...

गोंडपिपरी येथे युवा स्वाभिमान पक्ष समर्थित जय भवानी कामगार संघटनेचे उपोषण; सफाई कर्मचाऱ्यांच्या आहेत विविध मागण्या..

नागेश ईटेकर(तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: युवा स्वाभिमान पक्ष समर्थित जय भवानी कामगार संघटनेचे गोंडपिंपरी येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन साखळी उपोषणास सुरुवात दोन दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास सुरज ठाकरे स्वतः उपोषणाला बसणार

गोंडपिंपरी नगरपंचायत अंतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे हे प्रशासन दरबारी पाठपुरावा करीत आहे काही मागण्या मान्य देखील करण्यात आल्या परंतु गेल्या पाच वर्षांपासून थकित असलेले ईपीएफ चे पैसे कमी दिलेला पगार तथा कामगारांना शासनाकडून मिळत असलेल्या सुविधा अजून पर्यंत मिळाले नसल्याने व प्रशासनाकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने अखेर जय भवानी कामगार संघटनेच्या अंतर्गत गोंडपिंपरी येथील सफाई कर्मचारी हे आज दिनांक 03/02/2021, पासून नगरपंचायत समोरच उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

हे उपोषण साखळी उपोषण असून यावर देखील जर प्रशासनाला जाग आली नाही तर आमरण उपोषण देखील याच ठिकाणी सुरू करण्यात येईल असा इशारा जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दिला आहे समस्त सफाई कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्याय व कामगारांवर होत असलेल्या अन्याय जोपर्यंत पूर्णतः संपत नाही व त्यांना त्यांचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम राहील असे यावेळी सुरेश ठाकरे यांनी सांगितले सर्व सफाई कर्मचारी हे जय भवानी कामगार संघटनेचे च्या पाठीशी असून जवानी कामगार संघटना त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही देण्यास कटिबद्ध आहे गोंडपिंपरी नगरपंचायत येथे अंदाजे 35 सफाई कर्मचारी आहेत या 35 सफाई कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी हे वयोमर्यादा 60 पूर्ण झाल्याने कामावरून कमी करण्यात आलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या जागी त्यांच्या मुलांना किंवा मुलींना त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावे कथा गेल्या पाच वर्षांपासून थकित असलेले पीएफचे पैसे व गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या रोजी प्रमाणे रोजी मिळत नसल्याने त्या रोजीचे थकित असलेले पैसे हे तात्काळ देण्यात यावे या मागणी करता हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे साखळी उपोषण सुरू असताना देखील कर्मचारी ही आपली जबाबदारी न विसरता आपले काम तत्परतेने पुर्ण करीत आहेत व जनसामान्यांना सफाई बाबत च्या कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागू नये याची दक्षता देखील घेत आहे परंतु जर प्रशासनाने दोन दिवसांमध्ये यावर तोडगा काढला नाही तर सूरज ठाकरे हे स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती जय भवानी कामगार संघटनेतर्फे देण्यात आली आहे आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते व कामगारांच्या मागण्या कधी पूर्ण करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे……

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!