चंद्रपूर- सलग चौथ्या दिवशी जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले. बाजरी , मक्का,भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गावात शहरात आणि मार्गावरील अनेक झाडे कोसळलीत. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकदर रोज येथील इंदिरा गांधी हायस्कूल वादळी वाऱ्याने उडून गेले. योगायोगाने शाळेत कुणी हजर नसल्याने मोठी हानी टळली.
मागील चार दिवसापासून जिल्ह्यात विचित्र वातावरण सुरू आहे. दिवसभर लाहीलाही करणारी ऊन अन पाच वाजता नंतर वादळी पाऊस जिल्ह्यात बघायला मिळत आहे. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे. वादळी पावसाने या चार दिवसात अनेक घरांची पडझड झालेली आहे. पुन्हा काही दिवस जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्हावासियांची धाकधूक वाढली आहे.