बळीराम काळे /जिवती
जिवती(ता.प्र) : तालु्क्यातील बसस्थानकाजवळ, शाहिद वीर बाबुराव शेडमाके चौक, व बाजारवाडीत असे तीन शौचालय आहेत. बाजारवाडीतील शौचालय सोडता इतर दोन्ही ठिकाणी शौचालय व मुत्रीघरात घाणीचा दुर्गंन्ध कायम सुटत असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक यांची व विशेष करून
ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या शाळा, कॉलेज मधील मुली, महिला यांची स्वच्छता गृहाअभावी गैरसोय होत आहे.
मागील कित्येक दिवसापासून ही समस्या कायम आहे मात्र याकडे नगर पंचायत प्रशासन काना डोळा करत आहे. स्वच्छता गृह नसल्याने पुरुष वर्ग रस्त्याच्या बाजूला आडोसा घेतात मात्र महिला वर्गाची जास्तच कुचंबना होत आहे.
शहरात तीन शौचालय अस्तित्वात आहेत त्यापैकी बसस्थानक जवळील शौचालयाच्या दुर्गंधीमुळे जवळील कुटुंबाना देखील त्रास होत असल्याचे बोलल्या जात आहे. अस्तित्वातिल शौचालयाच्या स्वच्छते विषयी संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे शहरात अनेक ठिकाणी आपले शहर स्वच्छ सुंदर शहर, शहर स्वछ ठेवा असे चित्र संदेश दिसून येतात. शहरात महिलांसाठी शौचालय नसल्याने महिला, मुलींची नैसर्गिक विधीसाठी खूप कुचंबना होत आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह कधी होणार ? असा प्रश्न महिलावर्गातून उपस्थित केल्या जात आहे.
स्वच्छ शहर सुंदर शहर च्या जाहिराती केल्या जातात परंतु त्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाही. शहरी, ग्रामीण भागातून विविध कामासाठी पुरुषाप्रमाणेच महिला सुद्धा घराबाहेर पडतात तेंव्हा सर्वांना शौचालयाची गरज भासते. परंतु नगर पंचायत प्रशासनाने सार्वजनिक तीन ठिकाणी शौचालय बांधले परंतु महिलांना वापरण्यायोग्य अशी व्यवस्था नाही. नैसर्गिक विधी वेळेवर न झाल्यास आरोग्याच्या समस्या उदभवतात. पुरुष वर्ग कुठेही आडोसा धरून लघुशंका करू शकतो मात्र महिलांची खूप अडचण आहे.
त्यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी व मुख्य चौकात महिला व मुलीकरिता स्वतंत्र सार्वजनिक शौचालयाची उभारणी करणे गरजेचे आहे. अशी मागणी तालुक्यातील नागरिकांसह विशेष महिला वर्गातून होत आहे.