शरद कुकुडकर (प्रतिनिधी)
गोंडपिपरी: प्रस्तावित महाराष्ट्र-तेलंगणा मार्ग मरणवाट ठरला आहे.एकतर मार्गाचे बांधकाम सूरू आहे. दुसरीकडे मार्गात शेकडो खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी मार्ग उखळला आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठीच कसरत करावी लागत आहे.
गोंडपिपरी तालुका महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर वसला आहे.महाराष्ट्र-तेलंगणाची सिमा तालुक्याला लागून आहे.गोंडपिपरी-सिरपुर हा प्रस्तावित राज्यमार्ग आहे.या मार्गाचे बांधकाम सूरू आहे.संथगतीने सूरू असलेल्या बांधकामाचा फटका वाहनधारकाना बसत आहे.या मार्गात शेकडो खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी मार्ग उखळला आहे.तर मार्गावरील पुलाचे बांधकाम रखळले आहे.परिणामी या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावर लहान-मोठे अपघात घडले आहेत.दरम्यान मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी प्रवाश्यांनी केली आहे.