HomeBreaking Newsचंद्रपूर; गेल्या २४ तासात जिल्ह्यात १५२ नव्याने कोरोना पॉझिटिव्ह…०४ बाधितांचा मृत्यू...

चंद्रपूर; गेल्या २४ तासात जिल्ह्यात १५२ नव्याने कोरोना पॉझिटिव्ह…०४ बाधितांचा मृत्यू…

चंद्रपूर: जिल्ह्यात मागील २४ तासात १४७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, १५२ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २० हजार ६०७ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १८ हजार ३८२ झाली आहे. सध्या १ हजार ९११ बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ९३८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ३१ हजार १०७ नमुने निगेटीव्ह आले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक येथील ६९ वर्षीय पुरूष, तुकुम येथील ६२ वर्षीय महिला, गुरूनगर भद्रावती येथील ८१ वर्षीय पुरूष व मोतारा येथील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३१४ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २९१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १४ , यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. बाधीत आलेल्या १५२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील ५२ , चंद्रपूर तालुक्यातील सहा, बल्लारपुर तालुक्यातील नऊ, भद्रावती १८, ब्रम्हपुरी १२, नागभिड तीन, सिंदेवाही एक, मुल सात, सावली एक, राजुरा चार, चिमुर १६ , वरोरा १५, कोरपना तीन, व इतर ठिकाणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे.नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!