HomeBreaking Newsचंद्रपूर:- गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०९ कोरोना पॉझिटिव्ह...०३ जणांचा मृत्यु

चंद्रपूर:- गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०९ कोरोना पॉझिटिव्ह…०३ जणांचा मृत्यु

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात 191 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 109 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 18 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 16 हजार 625 झाली आहे.

सध्या एक हजार 868 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 41 हजार 636 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 18 हजार 543 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहराच्या नगीनाबाग येथील 60 वर्षीय पुरूष, देवला येथील 67 वर्षीय पुरूष व आष्टा भद्रावती येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 285 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 265, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 11, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!