HomeBreaking Newsपुलावर जिवघेणे खड्डे;बल्हारपूर-राजूरा पुल ठरतोय धोकादायक

पुलावर जिवघेणे खड्डे;बल्हारपूर-राजूरा पुल ठरतोय धोकादायक

राजूरा-  चंद्रपूर जिल्ह्यातून तेलंगणाकडे जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गावर असलेल्या वर्धा नदीवरील पुलाचे डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. बल्लारपूर-राजुरा दरम्यान हा पूल असून, त्याचे कठडेही काढण्यात आले. पुलावरील मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे चुकवताना अपघाताची मोठी शक्यता इथं निर्माण झाली आहे. दुचाकी वाहनधारकांना तर अक्षरशः कसरत करावी लागते. हा आंतरराज्यीय मार्ग असल्याने जड वाहतूक नेहमी सुरू असते. वर्दळीचा हा मार्ग आहे. पण ऐन पुलावरच खड्डे पडल्याने वाहतूक धोक्याची झाली आहे. जीव मुठीत घेऊन इथं प्रवास करावा लागतो.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!