बळीराम काळे (जिवती तालुका प्रतिनिधी)
जिवती (ता.प्र.) : जिवती तालुका येथे तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे सतत ७ डिसेंबरपासून तहसीलसमोर सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाच्या दिवशीही प्रशासनाने दखल घेतली नाही.त्यामुळे मंगळवारी तालुक्यातील संतप्त शेतकरी आणि व्यापारी रस्त्यावर उतरले.तसेच तालुक्यातील शाळा ,महाविद्यालय आणि परिसरातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या.मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत बंद ठेवण्याचा नागरिकांनी निर्धार केला आहे.
तालुक्यातील सर्वच व्यापारी संघटना,गोर संघटना ,अंगणवाडी सेविका संघटना , आशा वर्कर संघटना, ऑटो चालक मालक संघटना,शाळा ,महाविद्यालय ,विद्यार्थी , विद्यार्थिनी ,आणि सामाजिक संघटणानी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.विशेषतः तालुक्याला जोडणारे मुख्य रस्ते बंद पाडून राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी तसेच महामंडळाची बसेसला तालुक्यात येण्यास बंदचा इशारा नागरिकांनी दिला आहे.आणि लक्ष्मण मंगाम या उपोषणकर्याची प्रकृती अगदी खालावली असल्याने आज उपचारासाठी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले.
सुग्रीव गोतावळे , सुदाम राठोड, शबीर जहांगीदार,मुकेश चव्हाण,प्रेम पवार,विनोद पवार,विजय गोतावळे दयानंद राठोड, बालाजी वाघमारे आदी आंदोलन करीत आहेत.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी म्हणून देवराव भोंगळे हे उपोषणस्थळी येऊन,उपोषणकर्त्यासोबत चर्चा केली. उपोषणस्थळावरून ना.मुनगंटीवार यांना स्पिकरआँन करून फोन लावण्यात आला आणि उद्या किंवा परवा महसूल मंत्री,महसूल व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी व आंदोलनाच्या शिष्टमंडळासोबत नागपूर येथे बैठक आयोजित करण्याची आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
मात्र आंदोलकांचे वक्तव्य जोपर्यंत मार्ग निकाली लागणार नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. अशी ठाम भूमिका घेतली. जर का, त्यांच्या जीवांचे काही बरेवाईट झाल्यास एकमेव प्रशासन जवाबदार राहील असा इशारा तालुक्यातील नागरिकांनी दिला आहे.