जिवती (ता.प्र.) : तालुक्या अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम आदिवासी भागातील पाटागुडा व टेकामांडवा येथील दोन युवकांच्या हत्याप्रकरणी मागील चार महिन्यापासून मृतांचे कुटुंबीय सतत प्रशासनास जाग करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. त्यात रुग्ण सेवक जिवन तोगरे व संतोष शिंदे यांची हत्या असून त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट असून त्या नजीकच्या पोलिस स्टेशन अधिकारी यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी त्या दोन पोलिस अधिकारी शरद आवारी व म्हैसेकर यांना निलंबित करण्यात यावे.तसेच या प्रकरणाची चौकशी (सी.आय.डी.)कडून करण्यात यावी.वैद्यकिय अहवाल देणाऱ्या डॉक्टर वर कार्यवाही करण्यात यावी.यासाठी जिवती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चाचे नेतृत्व भागवत मोरे यांनी केले तर मार्गदर्शक म्हणून दत्तराज गायकवाड लोकस्वराज्य आंदोलन प्रदेश अध्यक्ष,गोपाळ रायपुरे प्रा.नक्कलवारआर पी आय,चंद्रपूर,समया पसुला मादिगा समाज अध्यक्ष,गडचिरोली,सौ.प्रियाताई खाडे आर पी आय चंद्रपूर,होते.
मोर्चा ला यशस्वी करण्यासाठी सौ सुनिता मोझेस नामवाड (महिला तालुका अध्यक्ष),संभाजी ढगे लोकस्वरज्य आंदोलन विदर्भ प्रमुख,बाळासाहेब शिंदे,सुबोध चिकटे भीम आर्मी तालुका अध्यक्ष,आशिष नामवाड,गजानन मसुरे,पंडित कांबळे,अमोल कांबळे,राहुल गायकांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने जिवती तालुक्यातील समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित राहिल्या.