गोंडपिपरी :तालुक्यात मागील महिन्याभरापासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे अनेक गावातील शेत शिवारातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे झाले पण शेतकऱ्यांना अध्याप कुठलीही तातळीची मदत झाली नाही.गोंडपिंपरी तालुक्यातील वर्धा, वैनगंगा, अंधारी व नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्यात असलेल्या ९८ गावातील शेत शिवारातील कापूस ,सोयाबीन, तूर, मिरची रोपे व भाजीपाला आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .तसेच अधून मधून पूर परिस्थिती या पावसाळ्यात निर्माण होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करणे ही कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असून शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा सोबतच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणी तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्फत राजुरा विधानसभा संपर्क प्रमुख अनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांच्या नेतृत्वात निवेदनातून केली आहे.यावेळीउपनगराध्यक्ष सारिका मडावी,नगरसेवक यादव बांबोळे,प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा,तालुका उपप्रमुख गौरव घुबडे,शिवसेना शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,जोगापुर शाखा प्रमुख पंकज डांगी,आक्सापुर शाखा प्रमुख दर्शन वासेकर,सकमुर शाखा प्रमुख सिकंदर गिणघरे,वेडगाव शाखाप्रमुख शुभम ढपकस ,वढोली शाखा प्रमुख राहुल मेकरतीवार,पेलूर शाखाप्रमुख
स्वप्नील नागपुरे,शुभम मेश्राम,जकिर शेख,प्रणय मेश्राम,गणेश रामगीरकर,श्रीधर मुंजनकर,तालुका उपसंघटक बबू पठान,तमुस अध्यक्ष संदीप लाटकर,वढोली शाखा उपप्रमुख नभात सोनटक्के,प्रमोद दुर्गे,समद शेख,अब्दुल आहात,प्रतीक निमगडे,प्रफुल कन्नके,शुभम धुर्वे,वैष्णव घोडाम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते