जिवती: मुल तालुक्यातील मुल ते चंद्रपूर जिल्हास जोडणारा मेन डांबरी करण रस्ता असून हा मुल निवासी व खेड्या पाड्यातील नागरिकांसाठी मुल वरून चंद्रपूर जाताना डांबरीकरण रस्त्यावर पूर्ण खडे पसरल्याने दुचाकी स्वार व वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सदर रस्त्यांनी मुल ते चंद्रपूर वरून तसेच गडचिरोली मध्ये जाण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरूच असते. त्याच रस्त्यावर मोठ मोठे खडे व हली पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने,काही ठिकाणी रस्त्यावर पूर्णतः गड्यात पाणी जर का,साचले तर गाडी चालवणे घातक बनते आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यतो वाढन्याचे चांसेस नाकारता येत नाही. म्हणून मुल ते चंद्रपूर कडे जाणाऱ्या हायवे मार्गावरील डांबरीकरण रस्त्यावरील पडलेल्या खड्यांवर संबंधित कंत्राटदारांनी गिट्टी व लाल मुरून टाकून त्यावर रोलर फिरवून दुचाकी वाहनधारकांना जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने रस्ता बनवून द्यावा अशी मागणी रस्त्यांनी जाणाऱ्या दुचाकी वाहन धारकासह मुल, सावली व इतर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मुल ते चंद्रपूर रस्त्याने जाताना अनेक एकेरी अपघात झाले आहेत परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही. वाहनधारकांना सदर रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागत आहे. या रस्त्याची इम्रान पठाण, भाजप महामंत्री तालुका चंद्रपूर यांनी संबंधित विभागाशी माहिती कळवली असता याची विभागणी दखल घेत कंत्राटदार यास रस्त्यावर अपघात होऊन जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे. तरी संबंधित कंत्राटदार व संबंधित विभाग यांनी लक्ष देऊन दुचाकी स्वार व वाहनास चालकास सुरळीत जाण्यासाठी रस्तावरील पूर्ण खडे दुरुस्त करून मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.
कोट :- इम्रान पठाण, भाजप महामंत्री तालुका चंद्रपूर यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्त करण्याला येश