HomeBreaking Newsतिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही...विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी...

तिथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचत नाही…विद्यार्थी कधी ऑटोने तर कधी जातात पिकअप वरती बसून…

बळीराम काळे, जिवती

जिवती:(तालुका प्रतिनिधी) माणिकगड पाहाडावरील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील तसेच जिल्ह्याच्या पश्चिम व दक्षिणेला तेलंगणा राज्याची सीमा लागून असलेला अतिदुर्गम व अतिमागास अशी जिवती तालुक्याची ओळख आहे.

भारी ते माराईपाटण, मार्गे बाबापुर चालणारी बस सेवा ही बंद झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची गैरसोय होत असतानाची दिसून येत आहे.शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना ४ ते ५ किमी.अंतर पाई चालत जाऊन शाळा करावी लागत आहे.

कदाचित वेळ पडली तर माराई पाटण व इतर परिसरातील विद्यार्थी हे पिकप, आटो,बोलेरो ईत्यादी प्रावेट गाडीने प्रवास करीत असताना दिसत आहेत. गावातील नागरिक व पालक वर्गाची बस बंदमुळे नाराजी व्यक्त करत असताना दिसून येत आहे. प्रवाशांची हालअपेक्षा प्रवाश्यांची होत आहे,आरोग्य विषयी मोठी समस्या निर्माण होत आहे.इमर्जन्सी पेशंट दवाखान्यात घेऊन जायचा म्हणजे १० ते २०किमी अंतरावर उपचारासाठी घेऊन जावे लागते. अशी परिस्थिती निर्माण होणार नाही.

यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राजुरा आगार प्रमुख यांनी बस सेवा ही सुरळीत सुरू करून गावातील परिसरातील अनेक प्रवासी व विद्यार्थी यांची गैरसोय होणार नाही.याहेतूने भारी ते माराईपाटण, मार्गे बाबापुर चालणारी बस सेवा चालू करावी अशी अपेक्षा करीत आहे. जर का,भारी ते माराईपाटण मार्गे बाबापुर बस सेवा चालू नाही केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!