Homeचंद्रपूरजिवतीशेतकऱ्यांच्या शेतात रानडुक्कराचा थैमान ; पिकांचे नुकसान रानडुक्कराचा बंदोबस्त करण्याची...

शेतकऱ्यांच्या शेतात रानडुक्कराचा थैमान ; पिकांचे नुकसान रानडुक्कराचा बंदोबस्त करण्याची मागणी : शेतकऱ्यांचे वनविभागाकडे साकडे

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील आधीच शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करीत असताना वन्य प्राणी शेतातील पिकांची नासाडी करीत आहेत. मरकागोंदी, कारगाव (खु), धानोली व परिसरातील गावातील जंगलालगत असलेल्या शेतात मध्यरात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा हैदोस सुरू आहे त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील पीक कसे वाचवावे या चिंतेत पडले आहे.
मरकागोंदी, कारगाव (खु), धानोली व परिसरातील जंगलालगत असलेल्या शेतात रानडुक्कराचा हैदोस सुरू आहे. रानडुक्कराचा कळप जंगलालगत लागून असलेल्या शेतातील पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी पिकांचे रक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
मरकागोंदी व कारगाव (खु) या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती असल्याने ते सतत वनविभागाची मदत करीत असतात तसेच अवैध उत्खननावरही आळा घालण्यात मदत करतात. शेतकऱ्यांना वनविभागामार्फत तार कंपाउंड, सौर लाईट, झटका मशीन उपलब्ध करून देऊन मदत करावी व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी, वनसडी यांना शेतकऱ्यांनी दिले.
यावेळी लिंगा गोविंद वेट्टी, रामचंद्र बिलाजी सिडाम,संपत तुकाराम मडावी, गजानन प्रभतराव मडावी, शालीक मानकु मेश्राम, त्रिवेणीबाई कोटनाके, धर्मराव पेंदोर व मरकागोंदी, कारगाव (खु) व धानोली गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!