सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरी: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, सकमुर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी आणि पालकांसाठी करण्यात आले होते. स्पर्धेसाठी विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्पणाताई रेचनकर सरपंच ग्रा. पं. सकमूर, ग्रा. प. सदस्य संतोष मुलगवार, जीवन अलोने, कुसुम अलोने, कोमल मुग़लवार, वेडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख इंद्रपाल मडावी, नंदा चटारे मुख्यधापिका जि. प. शाळा, सकमुर, रेवन टेकाम शा. व्य. समिति अध्यक्ष, मायाताई खर्डीवार उपाध्यक्ष शा. व्य. समिति, भाग्यश्री मुत्येमवार पोलीस पाटील सकमुर, अंगणवाडी सेविका वंदना भोगेकर, वंदना मुंजनकर, आशा वर्कर शामलता झाडे, प्रतिमा झाडे सी आर पी बचत गट सोबतच शा. व्य. समितीचे सदस्य दिगांबर कोरडे, छाया मुंजनकर, विद्या पुछलवार, गजानन काळे, अतुल घुबडे, सुलोचना पिपरे, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि बहुसंख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.
रांगोळी आणि निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षण बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि आभार किशोर गेडाम यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, क्लस्टर मॅनेजर हिराचंद रोहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सहाय्यक अधिकारी सचिन दळवी, समुदाय समन्वयक रंजित कालकुलवार यांनी परिश्रम घेतले.