बळीराम काळे/जिवती
जिवती (ता.प्र.) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत दिनांक १३ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट या कालावधीत संपूर्ण देशभर ” हर घर तिरंगा ” अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबात नागरिकांत जागृती निर्माण व्हावी, नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्या, या लढयातील क्रांतिकारक व अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायम स्वरूपी जनमानसात रहावी या उद्देशाने पोलीस स्टेशन जिवती च्या वतीने
रामनगर ते तहसील कार्यालय पर्यंत ” तिरंगा बाईक रॅली ” काढण्यात आली.
रामनगर जिवती येथून सचिन जगताप,सपोनि, पोलीस स्टेशन जीवती यांच्या हस्ते ” तिरंगा बाईक रॅली ” ला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी नगर पंचायत च्या नगराध्यक्ष, कविता आडे, डॉ. अंकुश गोतावळे, उपनगराध्यक्ष,नगर पंचायत जिवती, अमर राठोड, गटनेता, महेश देवकते, माजी उपसभापती, प.स.जिवती, प्रवीण चिडे, तहसीलदार, व तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व सुजान नागरिक उपस्थित राहून सहभाग नोंदविला. ” तिरंगा बाईक रॅली ” रामनगर जिवती ते शाहिद वीर बाबुराव शेडमाके चौक ते तहसील कार्यालय जिवती येथे समारोप करण्यात आला.
रॅलीत शेकडो नागरिक उपस्थित होते रॅली दरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद या नाऱ्यानी जिवती शहर दुमदुमले. तहसील कार्यालया समोर तहसील दार यांनी उपस्थितांना १३ ते १५ ऑगष्ट ला स्वंयस्फूर्तीने राष्ट्रध्वज आपापल्या घरी फडकवावा व राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी व १५ ऑगष्ट ला सायंकाळी राष्ट्रध्वज खाली उतरवून व्यवस्थित घडी करून कपाटात सन्मानाने ठेवावा असे मार्गदर्शनात सांगितले