Homeवाशीमउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ च्या प्रवेशिकास मुदतवाढ... 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे...

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ च्या प्रवेशिकास मुदतवाढ… 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

रंजित उंदरे (वाशीम जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यास आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सदर संकेतस्थळावरुन विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात.तरी, प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!