गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)
रेती घाटावर चालणाऱ्या गाड्यांच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होत असून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी चक सोमनपल्ली येथील एका शेतकऱ्याने केली आहे.
मौजा चक सोमनपल्ली येथील शंकर भाऊराव डोंगरे या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,त्याचे सर्वे नं ८६/२हे शेत रेती घाटा कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून आहे.या घाटा कडे ये -जा करणाऱ्या गाड्यांच्या धुळीमुळे त्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसान होत आहे.
त्याने शेतात लावलेली मिरची,कांदा,अन्य कडधान्याचे नुकसान झाले आहे.
त्याने गाडी चालकांना विनंती केली की , कच्च्या रस्त्यावर पाणी मारा ,जेणेकरून धूळ निर्माण होणार नाही.तथापी त्याचे ऐकण्यात आले नाही.
निवेदनात त्याने असेही म्हटले आहे की ,सोसायटीचे कर्ज घेऊन त्याने शेती केली आहे.अशा प्रकारे शेतीचे नुकसान होत असेल तर कर्ज फेडणे कसे शक्य होईल ?
प्रशासनाने गाड्यांच्या धुळीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्याने या निवेदनातून केली आहे.
निवेदनाच्या प्रतिलिपी त्याने जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,आमदार ,खासदार इ कडे धाडल्या आहेत.