बळीराम काळे,जिवती
जिवती : अचानक एका घराला सोमवारी पहाटे ०३:०० ते ०३:३० वाजता आग लागून लाखो रुपयांचे संसारिक साहित्य व नुकतेच कापूस विकून आणलेले रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना समोर आली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आसापूर येथील चंदू भिमु कोटनाके (४५) यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने भीषण रूप धारण करून घरातील संसार उपयोगी साहित्यासह शेतात निघालेला कापूस चंदू भिमु कोटनाके यांनी घरी जमा केला होता त्यापैकी दिवाळी सणासाठी कापूस विकू घरगुती साहित्य, कुटुंबातील सर्वांना आणलेले कपडे व इतर आणि काही रक्कम घरात होती त्यासह घरातील अनाज व इतर मौल्यवान वस्तूही जळून खाक झाल्या.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल.
आग विझविण्याचा गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. चंदू भिमु कोटनाके (४५) या शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
अस्मानी व सुलतानी संकटाने अगोदरच शेतकरी वर्ग संकटात आहे त्यात अजून आगीचे संकट आल्याने चंदू भिमु कोटनाके (४५) कुटुंब आगीने होरपळून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. सदर घटनेचा तात्काळ मोका पंचनामा करून कोटनाके कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.