चंद्रपुर: देशात शेतकऱ्यांवर होत असलेल्या हिंसक अत्याचारामुळे देशातील युवकांमध्ये भाजपविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. वाढती महागाई, शेतकऱ्यांवरील अत्याचार जर थांबवायचे असेल तर काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे हीच भावना आज देशातील युवा वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. म्हणूनच चंद्रपुरातील नवतरुणांनी चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पूर्णवसन मंत्री विजय भाऊ वड्डेटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला..
यावेळी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे, जिल्हा महिला अध्यक्ष (अजा) अनुताई दहेगावकर ,
विधानसभा अध्यक्ष सुनिल पाटील, उषा भोयर सोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते…