Homeसिरोंचासिरोंचा आलापल्ली मार्ग 24 तास ठप्प....

सिरोंचा आलापल्ली मार्ग 24 तास ठप्प….

Advertisements

 

सिरोंचा :-
सिरोंचा आलापल्ली या 100 किमी राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबत सातत्याने ओरड होत असतांना संबंधित विभाग मात्र मुंग गिळून आहे. यातच मंगळवारी याच मार्गावरील कंबलपेठा- रोमपल्ली गावाच्या जवळ तीन मोठे ट्रेलर चिखलात फसल्याने तब्बल 24 तासापासून वाहतूक ठप्प पडली आहे. यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सिरोंचा आलापल्ली या महामार्गावर मोठ-मोठे खड्डे प्रवासी व वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सिरोंचा जवळून वाहणाऱ्या गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीवर मोठे पुलाचे बांधकाम झाल्याने तेलंगणा, तामिळनाडू,कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद विजयवाडा सारख्या औद्योगिक शहरातून मोठ-मोठे मशिनरी आणि मालवाहक ट्रक तसेच छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांचे नेहमीच मार्गावरून आवागमन सुरु असते. या
अवजड वाहनामुळे सदर महामार्ग पूर्णतः खड्डयात गेले आहे. परिणामी दुचाकी, चारचाकी व इतर वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याचा फटका अहेरी गडचिरोली- चंद्रपूर जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे.मंगळवारी 30 किमी सिरोंचापासून अंतरावरील कंबलपेठा रोमपल्ली गावाच्याजवळ चिखलात फसलेले तीन मोठे ट्रेलर अद्यापही हटविण्यात न आल्याने सिरोंचा-आलापल्ली हा मार्ग मागील 24 तासांपासून ठप्प पडला आहे. वृत्त लिहिस्तोवर मंगळवारी सायंकाळपर्यंत मार्गावरील वाहतूक सुरळित सुरू झाली नसल्याची माहिती आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!