Homeचंद्रपूरगोंडपिंपरीपावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात.. गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त...

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात.. गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त…

-शरद कुकूडकार प्रतिनिधी

गोडपिपरी: मागील दहा ते बारा दिवसापासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

यंदा गोडपिपरी तालुक्यात या भागामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून दरूर, चेकदरुर, अडेगांव, धामनगांव, सुपगांव, नंदवर्धन, पानोरा, पारगांव, सालेझरी, येथे समाधान कारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, धान पिकासह विविध पिकांची लागवड केली.

अश्यातच मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातिल पिके धोक्यात आली आहे. प्रखर उष्णतेमुळे पिके कोमेजून चालली आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. शेतकऱ्यांनी पीकाना पाणी देणे सूरु केले आहे.

कधी-ओला दुष्काळ , तर कधी सुका दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या संकटाचाशेतर्कऱ्यांना सामना करावा लागतो आहे. अश्यातच आता पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतातील कापूस सोयाबीन धान तूर वाचविण्यासाठी उन्हात दिवसभर मोटारचा पाण्याने करत आहे जवळपास संपूर्ण शेतकर्यांनी कापूस, सोयाबीन, धान, तूर आदी पिकांची लागवड केली.

त्यामुळे जमिनीतील उभे पिके वाढ कमी झाले तरारत वर येवून वार्यावर डोलू लागली आहेत. मात्र गेल्या दहा दिवसापासून आभाळात केवळ ढंगाची गर्दी, उन सावलीचा खेळ होत असला तरी पावसाचा बेपत्ता झाला आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, वरुण राजाला विनवणी करीत आहे. आगामी दोन दिवसात पाउस पडला नाही तर शेतातील वार्यावर डोलणारी पिके करपण्याची भीती आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!