गोडपिपरी दि.6 आगस्ट शेतकरी जगायचं कि मरायच अशी परिस्थिती कोरोना च्या प्रादुर्भावामुळ शेतकऱ्यांचा समोर कामाला सुरुवात झाली आहे अशातच शेतकऱ्यांना काळ सुध्दा घात करताना दिसत आहे. गोडपिपरी तालुक्यांतील सुपगांव येथील शेतकरी श्री.लिबचंद कगारुजी दुर्गे वय 36 असे शेतकऱ्यांचे नाव असून तो नेहमीप्रमाणे सकाळी शेतात उठून गेला सध्या कपाशीवर फवारणी आवश्यकता असल्यामुळे सकाळी उठून फवारणीचे सर्व औषधी व साहित्य पकडून शेतात गेला. शेतकऱ्यांचा आनंद हा शेतीच्या पिकांत असतो आपले पिक पाहून पिकाला फवारणीची गरज आहे म्हणून शेतात गेला.ना पोटात अन्न जिवाची काळजी करत पूर्ण कपाशीवर फवारणी केला.आता फवारणी झाले माझे पिक भरभराट होईल या आनंदात होता.सकाळपासून आल्यामुळे आता माझी फवारणी झाली म्हणजे आता मी जेवण करू शकतो या विचाराने तो दुपारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या शेता जवळील विहीरीवर येऊन जेवण करण्याची तयारी केला जेवणाच्या डबा खोलून आता आपल्याला पाणी पिण्यासाठी पाण्याची गरज आहे म्हणून, विहीरीतून पाणी काढण्यासाठी बाटली टाकले असता या शेतकऱ्यांच्या अचानक टोल विहीरीत गेला. कुणी जवळ नसल्यामुळे त्या शेतकऱ्याला वाचून शकले नाही.या काळाच्या घाताने या निर्दोष शेतकऱ्यांचा जीव गेला.घटनास्थळी येऊन गोडपिपरी तालुक्यांतील निरीक्षक या घटनेची पाहणी करून लिमचदं दुर्गे यांच्या देहाला गोडपिपरी येथे पोस्टमाटम करीता पाठविण्यात आले.श्री.लिमचदं कगारुजी दुर्गे यांना एक मुलगा व एक मुलगी असुन अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब दुःख अवस्थेत आहेत
शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू…गोडपिपरी तालुक्यांतील सुपगांव येथील घटना
RELATED ARTICLES