राजूरा: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर वाढला आहे.अश्या स्थितीत शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर लसीची निंतात आवश्यकता आहे.मात्र खाजगी रूग्णालयांना मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत असतांना शासकीय रूग्णालयात तुटवडा निर्माण झाला आहे.शासकीय रूग्णालयात रेमडेसिविर लस आणि औषधांचा पुरवठा करण्याची मागणी आमदर सूभाष धोटे यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती अधिकच बिकट झाली आहे.दरदिवशी हजारो कोरोना बाधित आढळून येत आहेत.तर 20 ते 30 नागरीकांना कोरोनामुळे जिव गमवावा लागत आहे.अश्या स्थितीत रेमडेसिविर लसीची जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात मोठ्या प्रमाणात नितांत गरज आहे.मात्र जिल्हा प्रशासनाकडून खाजगी रूग्णालयांना लसीचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात असतांनाच शासकीय रूग्णालयात मात्र लसीचा तुटवडा असल्याची खंत राजूरा विधानसभेचे आमदार सूभाष धोटे यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
शासकीय रूग्णालयातील रूग्णांवर योग्य वेळी योग्य उपचार होत नसल्याने व वेळीच शासकीय रूग्णालयातील गोरगरिब रूग्णाना रेमडेसिविर लस मिळत नसल्याने अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे.खाजगी रूग्णालयात उपचार करणे गोरगरीबांना परवडणारे नाही.त्यांना शासकीय रूग्णालयाचाच आधार आहे. जिल्ह्यात निर्माण झालेल्या या स्थितीमुळे रेमडेसिविर लस फक्त श्रीमंतांसाठीच आहे काय? असा सवाल नागरीकांकडुन केला जात आहे. यात गरिब व श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव होत असल्याचे सामान्य नागरिक आता उघड उघड बोलु लागले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणे विषयी ग्रामिण भागातील जनतेमध्ये तिव्र असंतोष निमार्ण झालेला आहे.
रेमडेसिविर लस वाटपाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नियोजनबद्द पद्धतीने उपाययोजना करावी. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांना प्राधान्याने रेमडेसीविर लसीचा व औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा,अशी मागणी आमदार धोटे यांनी केली आहे.