उंदीरचे नाव ऐकताच लोकांना त्यांच्यामुळे होणारे नुकसान आठवते, तेच उंदीर आसाममधील काही लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत बनले आहेत. आसाममधील कुमारिकाता या गावात उंदरांना आणि त्यांना पकडणार्या लोकांना बरीच मागणी आहे. हे गाव गुवाहाटीपासून 90 किमी अंतरावर आहे. भारत भुतानच्या सीमेवर हे गाव वसलेले आहे.
वास्तविक पाहता आसामच्या या गावात लोक उंदराचे मांस मोठ्या उत्साहाने आणि चविने खातात. या गावात 200 रुपये किलोने उंदीर विकले जातात. या गावच्या बाजारात बरेच आदिवासी मृत उंदीर उकळवून विकताना दिसतील.
स्थानिक शेतकरी उंदीर शिकार ही शेतीसाठी चांगले मानतात कारण ते त्यांच्या पिकांचे नुकसान करतात. पण उंदीर पकडणे हा काही लहान मुलांचा खेळ नाही. त्यांना पकडण्यासाठी आदिवासींना कठोर परिश्रम करावे लागतात. कधी कधी हे आदिवासी रात्रीदेखील शिकार करायला जातात.
आदिवासी उंदीरांच्या बिळासमोर सापळे ठेवतात, उंदीर अन्नाच्या शोधात बाहेर पडताच त्यामध्ये अडकतात. हे मृत उंदीर दुसर्या प्राण्याने पकडून नेऊ नयेत, म्हणूनच हे मृत उंदीर रात्री देखील गोळा केले जातात. सुरूवातीला तुम्हाला हे थोड किळसवाणे वाटेल, मात्र तेथील लोकांसाठी हे पारंपरिक खाद्य आहे. तिथे इतर प्राणी, पशू जास्त खाल्ले जात नाही.