राजुरा-भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांचे स्वप्न पायलट बनण्याचे होते परंतु परिक्षेत ते अपयशी ठरले. अपयशी ठरलेल्या अब्दुल कलाम यांची आज ओळख म्हणजे मिसाईलमॅन माजी राष्ट्रपती अशी आहे. यावरून हे लक्षात येते की, कोणत्याही परीक्षेत अपयशी ठरल्यास घाबरून न जाता यशस्वी होण्यासाठी संर्घष करीत राहणे.
असे मार्गदर्शन प्रबोधन विचार युवा मंच तर्फे राजुरा तालुक्यातील वरूर रोड या गावी जगतगुरू संत तुकोबाराय सार्वजनीक वाचनालय येथे आयोजीत प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना ज्ञानाचे महत्व सांगुन दिनेश डोंगरे म्हणाले की, “एखादी खेळणी वस्तु विकत घेतल्यास महिणा दोन महिणा टिकेल परंतु वैचारीक ज्ञान मिळविल्यास जिवनभर टिकुन फायदा होईल असेही म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन तथा प्रास्ताविक आणि संचालन विशाल शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थीत असलेले रामदास पुसाम (पंचायत समिती सदस्य राजुरा) यांनी शिक्षणाचे महत्व सांगतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे जो कोणी पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” या घोष वाक्याचे आठवण करून दिले.
वरूर रोड या गावातील प्रतिष्ठीत नागरीक आबाजी धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना जिवनात प्रगती करण्यासाठी अविरत संघर्ष करणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी विचार मंचावर सौ. संगिता कोडापे सरपंच ग्रामपंचायत, कार्यालय वरूर रोड, सौ. संगिता भंडारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वरूर रोड, सौ. बेबीनंदा बोरकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष वरूर रोड आदिची प्रमुख उपस्थीती होती.
कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन लाभलेले विनोद सोनटक्के यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर प्रकाश टाकुन शिक्षणाचे महत्व ओळखुन जिवनात प्रगती करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गुरू मानुण प्रगती करण्यास सांगीतले. सोबतच इंग्रजी हि जगभाषा ओळखुन इंग्रजीला आत्मसाथ करून जगात उन्नती करण्यासाठी चांगल्या विचारांच्या लोकांशी मैत्री करून प्रगती करण्याचे आव्हान केले.
उपस्थित विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेवून स्पर्धेत सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांना प्रबोधन विचार युवा मंच तर्फे शालेय साहीत्य किट वाटप करण्यात आले.
उपस्थीत विद्यार्थ्यापैकी समिक्षा जिवतोडे आणि समिक्षा मोडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थीत असलेले रितीक खोब्रागडे यांनी जिवनात जिद्द आणि हिम्मत किती महत्वाची आहे हे पटवून देताना मोंटी राबर्ड यांच्या जिवनातील प्रेरनादायी प्रसंग सांगुन विद्यार्थ्यांमध्ये जोश निर्माण केले.
सोबतच विपुल रंगारी यांनी चांगले कार्य कधीही मरत नाही हे पटवून देताना स्वताच्या रक्ताच्या नात्यातील आजोबांच्या आजोबांचे नाव माहित नाही परंतु सावित्रीबाई फुले यांचे नाव आणि कार्य माहित असते असे सांगितले. व्यंकटेश वाघमारे यानी उपस्थित राहुन सहकार्य केले. तसेच गावातील नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.